महाराष्ट्रातील पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंतच्या निकालानुसार ९ ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तसेच ४ बाजार समित्या भाजप-शिवसेना युतीच्या ताब्यात आल्या आहेत. एक बाजार समिती इतरांच्या ताब्यात गेली आहे. जवळपास १४७ पैकी १४ बाजार समित्यांचे निकाल हाती आले आहेत. दरम्यान, यवतमाळमध्ये ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे.
हेही वाचा… अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!
शिवसेनेचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना आपल्याच होमग्राऊंडमध्ये धक्का बसला आहे. ठाकरे गटाने संजय राठोड यांच्या समितीचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला(MVA) १८ पैकी १४ जागी विजयी मिळवला आहे.
हेही वाचा… “..तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; दानवेंचा मोठा गौप्यस्फोट
संजय राठोड गटाचे फक्त ४ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय देशमुख (Sanjay Deshmukh)यांचा हा मोठा विजय समजला जात आहे. राज्यात भाजप आणि शिवसेनेचं युती सरकार आहे. पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष हा बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरं जात आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती. अखेरीस कॅबिनेट मंत्र्याचा त्यांच्याच जिल्ह्यात महाविकास आघाडीने धोबीपछाड दिला आहे.
Read also
हेही वाचा… ‘मलाही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यात रस’, आता आठवलेंचाही थेट दावा
हेही वाचा… धनंजय मुंडेंचा पंकजांना मोठा धक्का; अंबाजोगाईत ‘मविआ’चा दणदणीत विजय
हेही वाचा… “सोनिया गांधी म्हणजे विषकन्या, भरसभेत भाजपच्या नेत्याची जीभ घसरली”
हेही वाचा… शिवसेना भवन कुणाचे? ठाकरेंच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल