जळगाव : आदित्य ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्रभर झंझावती दौरे सुरू आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर जाहीरपणे टिका करीत आहेत. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते असलेल्य़ा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातून गद्दारांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच येणाऱ्या निवडणुकीत या गद्दारांना धडा शिकवा असं आवाहन देखील आदित्य ठाकरे यांनी जनतेला केलं.
“सत्ता तुमची पण आमदार मीच, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढू”; राष्ट्रवादीच्या आमदाराचा सज्जड दम
महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत गद्दारी झाली, गद्दार जरी बिकाऊ असले तरी जनता प्रामाणिक आहे. त्यांना ठाऊक आहे कोण विकास काम करतो, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं. देशात सत्यमेव जयतेला महत्त्व आहे, सत्तामेव जयतेला नाही. मुळे हे गद्दारांचे हे बेकायदेशीर सरकार लवकरच कोसळणार म्हणजे कोसळणार असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
“श्वेता महालेंच्या कार्यक्रमात तुफान हाणामारी, घाईघाईत दहीहंडी फोडली”
सरकार गेल्याचं दु:ख नाही. ते तुम्ही परत आणाल. पण प्रगतीशील महाराष्ट्रा रोखण्याच काम यांनी केलं आहे. कोविड काळात आपला जनतेचा जीव वाचवण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. याचं जगाने कौतुक केलं. महाराष्ट्र पुढे गेला तर इतरांच काय होईल म्हणूून त्यांच्या पोटात दुखत असेल. कोणत्याही जाती धर्मात वाद न लावणारं आपलं हिंदुत्व आहे. देशात आपलं नाव होत होतं हेच त्यांच्या पोटात दुखलं असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.
“तर उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला कवडीची देखील किमंत राहणार नाही”; देवेंद्र फडणवीस
बंड करायला हिमत लागते. यांनी गद्दारी केली. गुवाहाटीला गेले, तिकडे काय काय केलं आपण पाहिलं. गुवाहाटीत गेल्यावर 40 गद्दार लोक स्वत:ला शिवसैनिक समजत होते. मजा करत होते. पण तिथला पुर त्यांना दिसला नाही. राज्यातून शिवसेना संपवण्याचा कट रचण्यात आला. आम्हाला एकटे पडण्याचं हे षडयंत्र आहे. पण मला राज्यातील जनतेला विचारायचं आहे. तुम्ही आम्हाला एकटे पडू द्याल का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं. बाबाजी का ठुल्लू, असा घणाघाती हल्लाबोल देखील त्यांनी बंडखोर आमदारांवर केला.
Read also
- “गोविंदांना ५ टक्के आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र..;”छगन भुजबळांची प्रतिक्रिया
- “आदित्य ठाकरेंना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद, याचा अर्थ जनता आपल्यासोबत”; उद्धव ठाकरे
- “शेलार, दरेकर स्वत: च्या भावाला निवडून आणू शकले नाही अन्..;” पेडणेकरांचा हल्लाबोल
- “गद्दारांना तिकडे जाऊन काय मिळालं, बाबाजी का ठुल्लू,”आदित्य ठाकरेंचा घणाघात
- “देशातील काही महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न”; छगन भुजबळ