मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदविरोधात वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
कोकणात शिवसेनेची हप्तेखोरी, उद्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांच्या समोरच नावं जाहीर करणार – नारायण राणे
संजय राऊत म्हणाले, ‘शेतकऱ्यांचं आपण देणं लागतो, त्यामुळेच हा बंद आहे. हा आजचा महाराष्ट्रातील बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बंदला पाठिंबा नाही, बंद मोडून काढू अशी भाषा करणारे मूर्ख आहेत. आमचा बंदला पाठिंबा नाही अशी कोणी राजकीय विधान करत असेल तर त्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत का?, या देशातील शेतकऱ्यांचे देण लागतो का? हा प्रश्न स्वत:ला विचारावा. लखीमपूर खेरीत मंत्रीपुत्राने त्याच्या थार गाडीने शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अशी कुणाकडे एखादी गाडी असेल तर त्याने रस्त्यावर आणावी, रस्त्यावर उतरुन दाखवावं’, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला.
मोठी बातमी: शिवसेना स्वबळावर लढणार; राष्ट्रवादीला धक्का, काँग्रेस-भाजपलाही टक्कर देणार
देशातील शेतकऱ्यांची लढाई महाराष्ट्र लढत आहे. दीड वर्षापासून शेतकरी आंदोलन करत आहेत, यादरम्यान 400 पेक्षा जास्त शेतकरी मरण पावले. भाजपची सत्ता असलेल्या हरीयाणात काही शेतकऱ्यांचे डोके फोडले आहे. उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना चिरडून मारले. शेतकरी आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण एक दिवस बंद पुकारणार नसू तर जय जवान जय किसान या घोषणेला काहीच अर्थ नाही, असंही राऊत म्हणाले.
Read Also :
- बंद आणि विरोध यांचा ‘धंदा’, गोळा होतो त्यावरच ‘चंदा’; महाराष्ट्र बंदवरून अशिष शेलारांचा हल्लाबोल
- मुंबईत बेस्ट’च्या ८ बसेसची तोडफोड; ‘महाराष्ट्र बंद’ला हिंसक वळण
- नवाब मलिकांच्या जावयांनाही अटक झाली होती, मग मलिकांनाही जबाबदार धरायचे का?
- 11 ऑक्टोंबरच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून; शिवसेना पुर्ण ताकतीने सहभागी होणार
- एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे; रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी