नाशिक : राज्यातील राजकीय वातावरण गेल्या मागील काही दिवसापासून अस्वस्थ झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता टिकेची पातळी खालच्या स्तरावर निघून गेली आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी बंडखोर आमदारांवर कडाडून टिका केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा देखील समाचार घेतला आहे.
“ठाकरेंनी संजय राऊत या पोपटाचे तोंड बंद केलं पाहिजे, नाहीतर उरलेली जनताही निघून जाईल”
मला कुणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना आई-बहिणीवरून उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्यांनी त्या महाराष्ट्र राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते आणि मंत्री यांना द्याव्यात, आम्ही शिव्या देणाऱ्यावर फुलं उधळू असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यावर आता बंडखोर आमदारांनी आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांवर कडाडून टिका केली आहे.
“कार्यकर्त्यांवर कारवाई होते मग कोश्यारींवर कारवाई का नाही”; संभाजी राजेंचा सवाल
तसेच कर्नाटक सरकारने अक्कलकोटमध्ये कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नवस फेडायला गुवाहाटीला गेले होते. तिथून आल्यावर त्यांनी मुंबईत आसाम भवन उभारण्याची घोषणा केली. एकमेकांच्या राज्यात गेलं तर एकात्मता वाढेल. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुर- सोलापुरात कर्नाटकच्या संस्था उभ्या करण्याची घोषणा केली आहे. असं असेल तर आम्हाला देखील बंगळूरू आणि बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याची जागा द्या. कारण ती आमची जुनी इच्छा आहे.
“आरोग्य मंत्र्यांना जिल्हा संभाळता येत नाही, राज्य कसे संभाळणार”?
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबाबात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यवरून राज्यपालांवर सातत्याने टिका केली जात आहे. काल राज्यपालांचा पुणे दौऱ्याच्या वेळी राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून निषेध केला तर दुसरीकडे खासदार उदयन राजे यांनी देखील राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर हाकलून द्या. अशी मागणी केली आहे.
Read also
- भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
- हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्र्यांना ४६ बंगले नागपुरात तयार..! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार?
- “..तर आता माझ्यावर पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील”; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
- “मादर** संजय राऊत, तु यापुढे अशी भाषा वापरू नको”; बंडखोर आमदाराची जीभ घसरली*
- “महाराष्ट्र द्वेषी शिंदे- फडणवीस सरकार महाराष्ट्रातून लवकरच हद्दपार करा”