मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने मुंडेंवर बलात्कराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून त्यांच्या राजीनामाच्या मागणी केली जात असतानाच, तृप्ती देसाई देखील या मुद्यावर आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी माहिती दिली की सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
तृप्ती देसाईंनी मागणी केली की, रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. जर रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असे त्या म्हणाल्या.
Read Also :