मुंबई : राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नामांतराची घोषणा केली. त्याचबरोबर मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय देखील उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतराला स्थगिती दिली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारसाहेबांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची मागणी
मागच्या सरकारने जे काही घाईघाईने निर्णय घेतले आहेत. ते निर्णय पुढे देखील टिकायला पाहिजे. ज्यावेळी सरकार अल्पमतात असते त्यावेळी कोणतेही निर्णय घेणे उचित ठरत नाही. आताच्या मंत्रिमंडळात ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्या सर्व आमदारांचा विचार लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. चुकीचे निर्णय थांबवले जातील. त्याचबरोबर त्यांनी विकास निधीवरून देखील मागच्या सरकारवर निशाणा साधला.
गुलाल उधळण्यास विलंब होणार; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती
शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबाचं संभाजीनगरचं नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टोची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहेत. अशी टिका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
दिपक केसरकर कोण? कुठे होते? किती वेळा पवार यांच्या गाडीमध्ये बसून फिरत होते?
गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गटातील नेते सेेनेच्या काही खासदारांवर निशाणा साधत आहेत. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, ज्यांनी शिवसेनेसोबत जे काही पाप केले आहेत. त्या पापाचा खापर कुणावर तरी फोडण्यासाठी ते अशी पद्धतीची वक्तव्ये करीत आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांच्यामधील काही तुंबळ भांडण काही दिवसांनी माहिती पडणार आहे. सगळ्यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे सर्व जण एकमेकांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले.
Read also
- “औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही”
- उद्धव ठाकरेंचा ऑगस्टपासून महाराष्ट्रात झंझावत दौरा! बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर देणार
- उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
- “ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य
- “लबाड लांडगे ढोंग करतायत, दिलासा द्यायचं सोंग करतायत”