मुंबई : 2014 साली न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
बैलगाडा शर्यतीला परवानगी: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून महेश लांडगेंचे तोंडभरून कौतूक
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना आज सशर्त मंजुरी दिली आहे. अखेर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं राजकीय नेत्यांकडून स्वागत केले जात आहे. विशेषत, आमदार महेश लांडगे यांनी गेल्या काही दिवसांपासून बैलगाडा शर्यतीच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये तळ ठोकला होता. त्यामुळे, राज्यातील माजी मुख्यमंत्र्यापासून, भाजप प्रदेशाध्यापासून ते गल्लीबोळातील स्थानिक नेत्यांकडून आमदार महेश लांडगे यांचे कौतूक होता. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे याची कौतूकाने पाठ थोपटली आहे.
आमचा अतिशय पारंपारिक खेळ असलेल्या बैलगाडा शर्यतीवर मा. सर्वोच्च न्यायालयाने बंदी मागे घेतली, याबद्दल मी न्यायालयाचे मनापासून आभार मानतो.
2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. pic.twitter.com/2OBMkam9Ph— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 16, 2021
देवेंद्र फडणवीस म्हणाले, बैलगाडा हा आमचा (शेतकऱ्यांचा) अतिशय पारंपारिक खेळ आहे. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली. अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली.‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’म्हणजेच बैल हा धावणार प्राणी आहे, असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. त्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एक समिती तयार केली. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे. मला या निर्णयाचा अतिशय आनंद आहे. विशेषत आमदार महेश लांडगे यांचे देखिल मी मनापासून आभार मानतो.
Read Also :
- “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळेच बैलगाडा शर्यत परत सुरू”; योगेश टिळकर यांनी केले कौतुक
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव