रत्नागिरी : चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेचं बरं’, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी बोचरी टीका केली आहे. ते बुधवारी चिपळूणमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली.
उमेदवार शोधताना शिवसेना-काँग्रेसची दमछाक; देहू नगरीतील खरी लढाई राष्ट्रवादी-भाजपमध्येच!
‘विधानसभेच्या अध्यक्षांची निवड गुप्त पद्धतीने घ्यावी, तिथेही महाविकास आघाडीचा पराभव होईल’, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. ‘चंद्रकांत पाटील यांना मला एवढच सांगायच आहे की, विधानसभा किंवा राज्यसभा अध्यक्ष असतील यांची निवड करण्याची एक प्रक्रिया आहे. विधानसभेचा अध्यक्ष कोण करावा हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा आहे.’ असंही यावेळी भास्कर जाधव म्हणाले.
आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
विधानसभा किंवा राज्यसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधानिक प्रक्रिया चंद्रकांत पाटील यांना माहित नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी तुमची निवड होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, की निवड करण्याचे सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहेत.
Read Also :
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सुप्रिम कोर्टाच्या सुनावणीत उद्या अंतिम निर्णय, आमदार महेश लांडगे यांची माहिती
- किरीट सोमय्याच्या रडारवर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे; ‘त्या’ घोटाळ्याची ईडीमध्ये तक्रार दाखल
- ओबीसींचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा – नाना पटोले
- आणखी दोन वर्षांत मी विरोधकांकडे काहीच शिल्लक ठेवणार नाही; आर. आर. आबांच्या मुलाने शड्डू ठोकला
- शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती; सचिन सावंत यांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात