मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात हिंदुत्वाची व्होटबँक विकसित केली आणि त्यावर कळस चढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांनी केले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून चहुबाजूने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करून तारेच तोडले आहेत, असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले.
राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश
चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुण्यात हे वक्तव्य केले होते. तिकीट हे पक्षाचे असते. व्होटबँक पक्षाची असते. व्होटबँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. हिंदुत्वाची व्होटबँक ही संत, महंत आणि शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन व्होटबँक विकसित केली. त्याच्यावर अलीकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या नेत्यांनी कळस चढवला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात
चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची व्होट बॅंक तयार केली. त्यावर कळस चढवण्याचे काम मोदींनी केले, असे तारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपची छिंदम प्रवृत्ती आहे. व्होट बॅंकेच्या हीन राजकारणाशी शिवरायांचा संबंध जोडता?’
मनसेतील ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले ‘असं’ काही…
सचिन सावंत पुढे म्हणाले की, ‘शिवरायांची तुलना मोदींशी? आदित्यनाथ व विजय गोयल यांनी मोदींची तुलना शिवरायांशी केली होतीच. ‘आजके शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तक भाजपनेच काढले. हे जाणीवपूर्वक करत आहेत. शिवराय हे सद्विचारांचे प्रतिक आहेत व भाजप कुविचारांचे.’ त्यामुळे तुलना पातकच आहे. तात्काळ माफी मागा, अशी मागणी करतानाच सावंत यांनी निषेधही नोंदवला.
Read Also :
- आता किराणा दुकानात वाईन मिळणार; ठाकरे सरकार लवकरच घोषणा करणार?
- उमेदवार शोधताना शिवसेना-काँग्रेसची दमछाक; देहू नगरीतील खरी लढाई राष्ट्रवादी-भाजपमध्येच!
- पक्षातल्या रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आली; रुपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- हिंदू वोट बँकेचं माहित नाही मात्र शिवरायांनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं – सजंय राऊतांचा टोला