पिंपरी चिंचवड : २१ डिसेंबरला राज्यातील विविध नगरपंचायतीबरोबरच नवनिर्मित देहू नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. देहू नगरीचीही ही पहिली निवडणूक आहे. यासाठी सोमवारी (ता.१३) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा चारही प्रमुख पक्षांनी पहिल्या निवडणुकीत स्वबळ जोखण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, येथे बहूरंगी लढती होणार आहेत. तर, दोन प्रभागात थेट लढत होत आहे. विषेशत: अर्ज छाननीतच अनेकांनी माघार घेतली तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे, तेथिल निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
“काँग्रेसला स्वतःची मते राखता आली नाहीत, ते राज्याचे नेतृत्व काय करणार?”
देहू नगरपंचायतीत १७ जागा आहे. ग्रामपंचायतीतही १७ च सदस्य होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ओबीसींच्या चार जागा वगळून देहूत १३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. काल दहा उमेदवारांनी माघार घेतली. त्यातही कॉंग्रेसच्या वनिता देशकर यांची माघार चर्चेचा विषय ठरली. तर, काँग्रेसच्या एका उमेदवाराचा अर्ज छाननीतच बाद झाला. त्यामुळे त्यांचे फक्त पाचच उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
स्वबळावर लढणाऱ्या या पक्षाला सर्व जागांवर उमेदवारही मिळाले नाहीत. अशीच स्थिती काहीशी शिवसेनेची आहे. ते फक्त आठ जागा लढवित आहेत. ऐनवेळी उमेदवार आयात करून म्हणजे त्यांची पळवापळवी करून निवडणूक लढवायची नसल्याने पक्षाच्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असल्याचे शिवसेनेतून सांगण्यात आले. त्यामुळे या निवडणुकीत खरी स्पर्धा व चुरस ही भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच होणार आहे. कारण या दोन पक्षांनीच सर्वच्या सर्व १३ जागांवर उमेदवार दिले आहेत. पूर्वीच्या देहू ग्रामपंचायतीतील सरपंच हे राष्ट्रवादीच्या विचाराचे होते. देहू हा आमचा बालेकिल्ला असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे.
तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेने आघाडी घेतली आहे. त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ शनिवारी फोडला. तर, राष्ट्रवादीने मंगळवारी जाहीर प्रचार सुरु केला. ग्रामपंचायतीची नगरपंचायत होण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी केलेला आहे.
राजकारण महाराष्ट्राचे : भाजपाच्या चित्रा वाघ यांना रोखण्यासाठीच रुपाली पाटलांचा प्रवेश
निवडणुकीनंतर दोन स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. बारणे तसेच मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, तर भाजपचे माजी आमदार व माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासाठी ही नगरपंचायतीची निवडणूक पहिलीच असल्याने काहीशी प्रतिष्ठेची ठरणार आहे. दुसरीकडे प्रचारासाठी जेमतेम आठवड्याचा कालावधी आहे. त्यामुळे अपक्षांचा खरा कस त्यात लागणार आहे.
Read Also :
- पक्षातल्या रिकामटेकड्या नेत्यांमुळे पक्ष सोडण्याची वेळ आली; रुपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- ठाकरे सरकारला मोठा धक्का: ओबीसी आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
- हिंदू वोट बँकेचं माहित नाही मात्र शिवरायांनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं – सजंय राऊतांचा टोला
- मनसेतील ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले ‘असं’ काही…
- भाजपची महाराष्ट्रातील ‘ही’ बुलंद तोफ धडाडणार आता गोव्यात