मुंबई : देशात, तसेच राज्यात देखील महामारीच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं लोक बाधित झाल्यानं आरोग्य यंत्रणांवर भार वाढला असून, सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. बेड आणि रेमडेसिवीरबरोबरच सध्या देशातील विविध राज्यात ऑक्सिजन तुटवड्यावरून प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून, यावरूनच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केंद्र सरकारवर टिका केली होती.
त्यांनी केंद्र सरकारच्या माहिती विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीचा दाखला देत, “आज देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीतून स्पष्ट होतं. ‘मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चांगली स्थिती असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर केंद्र १ लाख टन ऑक्सिजनची आयात करत आहे,’ असं म्हटलं होतं.
केंद्र सरकार के प्रेसवार्ता के अनुसार, अक्तुबर २०२० मे भारत मेडिकल ऑक्सीजन आपूर्ती के मामले “extremely comfortable” स्थिती मे था | और केंद्र सरकार १ लाख टन मेडिकल ऑक्सीजन आयात कर रही थी | https://t.co/MI8GCOrG5o https://t.co/IYjiHZcOTI pic.twitter.com/ndpdnTbdKM
— Prithviraj Chavan (@prithvrj) April 28, 2021
दरम्यान, त्यांच्या आज भाजपने प्रत्युत्तर दिलं असून, महाराष्ट्र भाजप प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करत पृथ्वीराज चव्हाणांच्यवर टीका केली आहे. “चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. करोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी येईल असं स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला. https://t.co/iPH9wohsyj
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 28, 2021