मुंबई : आमदार रामदास कदम यांच्याबद्दल सध्या शिवसेनेत नाराजीची भावना आहे. याचा फटका त्यांना विधान परिषद निवडणुकीच्यावेळी बसण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचे बोलले जात आहे. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद पुरवली, असा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता. त्यामुळे शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता कट होणार असल्याचेही बोलले जात आहे.
भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. अलीकडेच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे निमंत्रण रामदास कदम यांना देण्यात आले नव्हते. निमंत्रण देण्याचे टाळले, त्यामागे कोरोना नियम, ५० टक्के उपस्थितीचे कारण देण्यात आले होते. खरंतर रामदास कदम हे शिवसेनेतील वरिष्ठ नेते आहेत. शिवसेनेकडून त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवले. फडणवीस सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते. त्यामुळे इतक्या वरिष्ठ नेत्याला दसरा मेळाव्याला न बोलावल्याने राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी; शिरूरमध्ये उडाली एकच खळबळ
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास कदम यांच्या जागी आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरु झाला आहे. रामदास कदम यांची विधान परिषदेचे मुदत 2022 ला संपत आहे. त्यांचे सदस्यत्व कायम ठेवले जाणार नसल्याची माहिती आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. पक्षाला उपयोगी पडणारा, नियम न तोडणारा, आणि तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरु आहे. विधान परिषदेत रामदास कदम यांच्याजागी विभागप्रमुख किंवा युवासेनेच्या पदाधिकाऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Read Also :
- शिवसेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अन् सेना आमदाराच्या होर्डिंगवर थेट मोदींची फोटो लागला
- पंकजा मुंडेवर भाजपने सोपविली मोठी जबाबदारी; मध्यप्रदेशातील निवडणुकीचा प्रचार करणार
- आमदार रवी राणांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राडा; नियोजन भवनासमोर कुजलेल्या सोयाबीनची केली होळी
- चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये – नवाब मलिकांचा टोला
- शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूची लागवड करण्याची परवानगी द्या; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला