अमरावती : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक काल दुपारी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थिती मध्ये घेण्यात येणार होती. मात्र या बेठकीच्या पूर्वीच युवा स्वाभिमानीचे कार्यकर्ते खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी आक्रमक पवित्रा घेत नियोजन भवनाच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ कुजलेल्या सोयाबीनची होळी करीत कुजलेले सोयाबीन आणि संत्रे फेकून केला राज्य सरकारचा जाहीर निषेध केला व प्रचंड नारेबाजी केली. या वेळी काही वेळा साठी नियोजन भावना समोर चांगलीच खळबळ माजली होती.
अमरावती जिल्हयामध्ये सततच्या अतीवृष्टीमुळे व नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिके व फळपिके जसे सोयाबीन, मुंग, उडीद, संत्रा, कपासी, तुर, ऊस, धान, पानपिंपरी व कापुस पिकावर आलेला लाल्या रोग व बोंडअळी यामुळे पिके नष्ट झाली असून शेतकरी हवालदिल झालेला आहे तो आर्थीक परिस्थितीने त्रस्त झाला आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करीत असून दिवसेंदिवस प्रमाण वाढत जात आहे.
पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या दोन्ही आमदारांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मैदानात!
अशा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ३०,०००/- हजार रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी आजच आजच्या या सभेच्या माध्यमातुन सर्वानुमते ठराव घेऊन तो मा. मुख्यमंत्री यांचेकडे पाठवावा. शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करण्याकरीता व शेतकऱ्यांच्या जिवनातील अंधार दूर करण्यासाठी दिवाळीपुर्वी हे पैसे (ता. २८) रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैस टाकावे तरच शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होणार अशी मागणी आमदार रवी राणा यांनी यावेळी केली आहे.
Read Also :
- चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये – नवाब मलिकांचा टोला
- शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूची लागवड करण्याची परवानगी द्या; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला
- आरआर आबांनी मला तेव्हाच सांगितलं, गृहमंत्री झाल्यावर शुगर-बीपी त्रास सुरु होतो – जयंत पाटील
- बाळासाहेब ठाकरेंमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; शिवसेना आमदाराचा दावा
- राज्यातील हॉटेल, दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास परवानगी; मुख्यमंत्री ठाकरेंचा महत्वपुर्ण निर्णय