मुंबई : भाजप कुणामुळे मोठा झाला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्व दिलं म्हणून भाजप पक्ष मोठा झाला. आज तेच भाजपचे नेते टेचात सांगत आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो प्रचारात लावला म्हणून शिवसेनेचे आमदार निवडून आले. मात्र भाजपचं असित्त्व आहे तेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे.
आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?
सावर्डे या ठिकाणी झालेल्या सभेत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचे फोटो लावले होते. मात्र 1984 ला बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो होता याचा विसर भाजपला पडला आहे. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावून तुम्ही मोठे झालात आणि आता नरेंद्र मोदींच्या फोटोंचं कौतुक कसलं सांगता असाही प्रश्न भास्कर जाधव यांनी विचारला.
गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही असे म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते. बाळासाहेबांचे फोटो लावून तुम्ही तुमचा पक्ष वाढवलात आता मोदींचं कौतुक कसलं सांगत आहात? असाही प्रश्न भास्कर जाधवांनी उपस्थित केला.
फक्त मराठी माणसेच भ्रष्टाचारी आहेत का? भाजपाचे षडयंत्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. फक्त मराठी माणसांवरच कारवाई करता. यापूर्वी ईडी, एनसीबी, सीबीआय नव्हती का? जरा विरोधात बोलले की चौकशी लावतात. मराठी माणसाला संपवण्याचे काम सुरु आहे. हे केवळ मुंबई महानगर पालिका ताब्यात घेण्याकरता सुरु आहे. ७० वर्षे काँग्रेसने राज्य केले पण त्यांनी कधी शिवसेना भवनाबद्दल कधी वाईट शब्द काढला नाही असंही भास्कर जाधव म्हणाले.
सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केले तर ते म्हणतात आमच्या पाठीत खंजीर खुपसला. काल म्हणाले बेईमानी सरकार. एक महिना सरकार होत नव्हतं. चर्चा सुरु होती. शिवसेना पहिल्यांदा राष्ट्रवादी सोबत गेली की भाजप? 80 तासांचं सरकार कुणी बनवलं? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी केंद्रातील मंत्र्यांची बैठक घेतली होती. रातोरात सरकार बनवून तुम्ही शिवसेनेला फसवलं. तुम्ही खणलेल्या खड्ड्यामध्ये तुम्हालाच पडावं लागलं ही बाळासाहेबांची पुण्याई आहे असाही टोला भास्कर जाधव यांनी लगावला.
Read Also :
- राज्यातील हॉटेल, दुकाने रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास परवानगी; मुख्यमंत्री ठाकरेंचा महत्वपुर्ण निर्णय
- काँग्रेस आमदाराने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना लावले हूक; एकाच झटक्यात ५० कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी; शिरूरमध्ये उडाली एकच खळबळ
- मुंबईत राजकीय भुकंप? भाजपचे १५ ते २० नगरसेवक डिंसेंबरमध्ये शिवसेनेते करणार प्रवेश
- शेवटच्या क्षणी काँग्रेस वगळता इतर पक्षांची युती होऊ शकते – गिरीष महाजन