नवी दिल्ली : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशचं प्रभारी करण्यात आलं असून त्या मध्यप्रदेशातील विधानसभा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा प्रचार करणार आहेत. राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर पंकजा यांच्याकडे पहिल्यांदाच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीत त्यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
मुंबईत राजकीय भुकंप? भाजपचे १५ ते २० नगरसेवक डिंसेंबरमध्ये शिवसेनेते करणार प्रवेश
त्या म्हणाल्या, निवडणुका लढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मी मध्यप्रदेशची प्रभारी आहे. मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात निवडणूक सुरू आहे. तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. मी त्याचा प्रचार करणार आहे. प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले आहेत. निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. प्रत्येकजण काम करत आहे, असं सांगतानाच आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलं उचलतो तसं सामाजिक पावलंही उचलणार आहोत. त्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली, असं पंकजा यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी; शिरूरमध्ये उडाली एकच खळबळ
यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील ओबीसीला आरक्षण मिळालं होतं. ते 50 टक्क्याच्यावर गेलं होतं. 50 टक्क्याच्यावरचं आरक्षण रद्द होणार असल्याची शंका असताना सर्वच्या सर्व आरक्षण रद्द झालं. त्यामुळे ओबीसींमध्ये संताप आहे. त्यावर आम्ही राजकीय आणि सामाजिक भूमिकेतून बोललो आहे. मराठा आरक्षणही रद्द झालं आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संताप आहे. इतर राज्यांनीही त्यांच्या पातळीवर आरक्षणाबाबत भूमिका घेतली आहे, असं त्यांनी सांगितलं. घटनेत देशाचे आणि राज्याचे अधिकार क्लिअर आहेत. त्याप्रमाणे बदलत्या काळाप्रमाणे काही निर्णय घेतले पाहिजे. घटनेत काही अमेंडमेंट करण्याची गरज आहे. विधानसभेच्या लेव्हलवर काही बदल करता येतात ते केले पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- आमदार रवी राणांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राडा; नियोजन भवनासमोर कुजलेल्या सोयाबीनची केली होळी
- चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये – नवाब मलिकांचा टोला
- शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूची लागवड करण्याची परवानगी द्या; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला
- आरआर आबांनी मला तेव्हाच सांगितलं, गृहमंत्री झाल्यावर शुगर-बीपी त्रास सुरु होतो – जयंत पाटील
- बाळासाहेब ठाकरेंमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले; शिवसेना आमदाराचा दावा