मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ या पुस्तकाच्या प्रकाशन पार पडले. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते होते. या कार्यक्रमात भाजप नेत्यांकडून तुफान फटकेबाजी करण्यात आली.
‘आपल्याला फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही. फक्त जोपर्यंत विरोधी पक्षामध्ये आहात तोपर्यंत विरोधकांची भूमिका निभावत राहू’, असे सूचक वक्तव्य यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी विदर्भाच्या मुद्यावरून देखील मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच म्हणाले होते की, आमच्यामध्ये विदर्भाचं रक्त आहे. त्यांच्यावर किमान हे म्हणण्याची तरी वेळ आली याचं आम्हाला समाधान आहे. पण विदर्भाचं नुसतं रक्त असून चालणार नाही कारण अनेक नेत्यांनी विदर्भाशी बेईमानी केली तशी बेईमानी तुम्ही करु नका.’, असा टोला फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.
मुंबई मेट्रोच्या कामावरून देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला.
Read Also :
- भाजपच्या मनधरणीला अपयश, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे करणार उपोषण
- ‘आता एक बाजू निवडण्याची वेळ आलीये’, शेतकरी आंदोलनाबाबत राहुल गांधींनी मांडली भूमिका
- ‘मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात’, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना टोला
- ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्याला सुरुवात, जयंत पाटील 18 दिवसात घेणार 82 मतदारसंघांचा आढावा
- कृषी कायद्याविरोधात विरोधी पक्षांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणार