मुंबई : आजचे विचार प्रत्येक बुथमधून आपल्या घरोघरी पोहचवायला हवं आहे. आमच्या शिवसैनिकांना पैसे देऊन बोलवण्याची गरज पडत नाही. एक शिवसैनिक हा लाख शिवसैनिकांच्या बरोबर आहे. खुर्च्या खुप मिळतात. पंरतु बाळासाहेबांचा आत्मा मिळत नाही. असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावरील भाषणातून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांनी जे काही करता येईल. तेच आतापर्यंत केलं आहे. उगाचच आश्वासन देऊन थापा मारणं उद्धव ठाकरे यांनी कधीही केलं नाही. याच मैदानावरून २०१२ च्या दसऱ्याच्या मेळाव्यातून बाळासाहेबांना शपथ दिली होती. की आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठिंशी राहू. बाळासाहेबांचे विचार आठवत नाही. राष्ट्रवादीसोबत गेलेत म्हणून आम्ही गेलो नाही म्हणून ते गेलेत. परंतु आता ते गेले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. या मैदानावर बाळासाहेबांची खुर्ची ठेवण्यात आली आहे. यावरून आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावर टिका केली जात आहे.