मुंबई : मागील काही काळापासून बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामध्ये आधीच कोरोनाच्या संकटाने कामकाज ठप्प आहे आणि त्यातच आता फिल्म इंडस्ट्रीसमोर वेगवेगळी आली त्यामुळे आम्ही सरकार आणि मुख्यमंत्री या नात्याने फिल्म इंडस्ट्रीला आलेले अश्रू पुसणार आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
या इंडस्ट्रीकडे केवळ करमणूक करणारे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. पण रडविण्यापेक्षा हसविणे फार अवघड असते आणि ती ताकद या माध्यमात आहे. ‘मेरा नाम जोकर’ मध्ये सगळ्यांना हसविणाऱ्या जोकरचे एक आयुष्य आहे, त्यालाही अश्रू येतात. त्याप्रमाणे या इंडस्ट्रीला येणारे अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणे गरजेचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली.
आज महाराष्ट्रात चित्रपट निर्मिती होते तिचा दर्जा चांगला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान हवे, आपल्याला जागा हवी असेल त्यप्र्माने एक एक्शन प्लान बनवा. प्राधान्यक्रम ठरवा, आपण निश्चितपणे त्यावर काम करू. शेवटी हाही आमचा एक मोठा परिवार आहे. तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहात त्यामुळे त्यांना बळ देणे हे सरकारचे काम आहे, अशी शाश्वती मुख्यमंत्र्यांनी दिली.
Read Also :
भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक, चतुःशृंगी पोलिसांची कारवाई
‘अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या कपड्यांवर दिसतायेत’, आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला
‘मंत्री यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावरून काढल्यास ठाकरेंना महाविकास आघाडी सरकार पडण्याची भीती’