मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात, पडद्यामागे काहीतरी शिजतंय, असं बोललं जात होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मुख्यमंत्र्यांची ३ दिवसात २ वेळा भेट घेतली. त्यानंतर तिथूनच ते शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर गेले.
“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही” – शरद पवार
त्यानंतर, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी, वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे, महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात होते.
केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही
दरम्यान, यावेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चाललेल्या, जवळपास दोन तासाच्या बैठकीबद्दल आज स्वतः शरद पवारांनी खुलासा केला असून, या दोघांच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी, डॉ. डी. वाय. पाटील कृषी आणि तांत्रिक विद्यापीठाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
तसेच, यावेळी त्यांनी राज्यातल्या आणि देशातल्या इतरही काही मुद्द्यांवर भाष्य केलं…
- “मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ सरकार अधिक गतिमान कसं करता येईल, यासाठी चर्चा झाली.
- काँग्रेकडून, विधानसभा अध्यक्ष पदासाठी जो उमेदवार असेल, त्याला तिन्ही पक्ष समर्थन देतील.
- ५६% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे, शेतीच्या अर्थकारणात सुधारणा करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. शेती जर सुधारली तर अर्थकारण बदलेल.
- कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज.
- अन्नधान्य आयातापासून तांदूळ, साखरेचा ‘सर्वात मोठा निर्यातदार देश’ अशी भारताने प्रगती केली.
- केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले ३ कृषी कायदे लागू करू नयेत, यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याविषयी या अधिवेशनात विचार करणार.
- केंद्र सरकारने, दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी. त्यांच्या आंदोलनाला राजकीय लेबल लावू नये.
Read Also :
- गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं सोलापुरचं कार्यालय फोडलं
- “जास्त दिवस चालणार नाही, हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल”
- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वबळावर लढणार; भाजप कोंडी करणार?
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले
- कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईन; महादेव जाणकरांची गर्जना