पुणे : भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना, सरकारवर जोरदार हल्लबोल करत, “राज्यातील आघाडी सरकार, जास्त दिवस चालणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडेल, फक्त वेळेचा प्रश्न आहे,” असं भाकीत केलं आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता?
“सरकार विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला घाबरत आहे. यावरूनच त्यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही, हे स्पष्ट होत आहे,” असं सांगत, “विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही, याबाबत पक्ष निर्णय घेईल”, असं सांगितलं आहे.
विधानसभेच्या अध्यक्षपद निवडीवरुन महाविकास आघाडीत संभ्रम कायम?
यावेळी त्यांनी, “मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत हे आघाडी सरकार गंभीर नाही. यांच्याकडून काही हा तिढा सुटेल असंही वाटत नाही. त्यामुळे, आता मलाच सर्वोच्च न्यायालयात जाऊन पुनर्विचार याचिका दाखल करावी लागणार आहे. माझ्याकडून याची तयारीही सुरू झाली असून, या सरकारमुळेच मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षण गेलं. त्यामुळे, राज्यात सरकार विरोधी वातावरण आहे. हेच सरकारला हवं काय?, असा रोखठोक सवालही त्यांनी आघाडी सरकारला केला आहे.
नाशिकमध्ये अजित पवारांविरोधात आंदोलकांची घोषणाबाजी; मराठा कार्यकर्त्यांना अटक
तसेच, “मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ठाकरे सरकारने श्वेतपत्रिका काढायला हवी होती. मात्र, ते सोडून सरकार सर्व काही केंद्रावर ढकलंत आहे. आता तर ही नवीन फॅशन झाली आहे, “काहीही झालं ढकला केंद्र सरकारवर”, त्यामुळे आता मीच पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वबळावर लढणार; भाजप कोंडी करणार?
- इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू – नाना पटोले
- कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईन; महादेव जाणकरांची गर्जना
- “शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही” – शरद पवार
- पंढरपूरच्या वारीनं देशातीलच नव्हे, जगातील कोरोना नामशेष होईल – संभाजी भिडे