मुंबई : केंद्र सरकारला कोणी काही सांगतय का? मुंबई उपनगरांची हि कनेक्टिव्हिटी आहे, आणी आरे हे जंगल आहे, राज्याच्या जबाबदार मुख्यमंत्र्यांनी आपले शपथपत्र दाखल केले आहे, पण आता काय निर्णय घ्यायचा तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य तो निर्णय घ्यावा अशी भूमिका महापौर पेडणेकर यांनी घेतली आहे.
समाजमाध्यमातून मला कळलय कि केंद्र सरकारने कांजुर मार्गातील मेट्रो प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. मुळात हि जागा राज्याची आहे, पण मुख्यमंत्री बदलल्यावर सगळं बदलत का? मला नक्की काळात नाहीये, आम्ही संभ्रमात आहोत कि केंद्राची नेमकी भूमिका काय आहे? असा सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर त्यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई मेट्रोसाठी कारशेड उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरची जागा उपलब्ध करून दिल्यावर आता त्यावरून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे, याआधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आरे ची जागा कारशेडसाठी दिली होती, पण त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध करत कारशेडचं काम बंद पाडले होते.
पण आता केंद्र सरकाने यासंबंधीची एक नोटीस महाविकास आघाडी सरकारला दिली आहे, त्यामध्ये कांजूरची जागा हि केंद्रसरकारची असून त्यावर सरकारने हक्क सांगू नये अस त्यात म्हटलं आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारला हा प्रकल्प रद्द करण्याची सूचना केली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार किंवा भगतसिंग कोश्यारी विरुध्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मोठे वाद रंगले होते. पण आता मुंबई मेट्रोवरुन ते वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता आहे.
Read Also :
मेट्रो कारशेडवरुन आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार रंगणार वाद
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पुर्ण करणार- मंत्री प्राजक्त तनपूरे