मुंबई : महाराष्ट्र राज्यातील महाविकास सरकारकडून पोलीस बळाच्या जीवावर भाजप कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरु असून पोलिसी बळावर आमचा आवाज दाबून टाकू असं जर सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे.
जेव्हा इंदिराजींनी देशात आणीबाणी लावली तेव्हा आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या संघर्ष हा भाजपच्या डीएनएत आहे, त्यामुळे जे इंदिरा गांधींना जमले नाही ते तुम्हाला काय जमणार? असा खोचक सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांनी काश्मिरातील कलम ३७० हटवण्यात आलं असून आता हळूहळू जम्मू आणि काश्मीरमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पण आता तेथे कलम ३७० पुन्हा लागू व्हावं म्हणून काही भारतविरोधी शक्ती काम करत असून त्यात काँग्रेसही सहभागी झाली आहे. गुपकर ठराव काँग्रेसला मान्य आहे का? देश तोडणाऱ्या शक्तींच्या अजेंड्याला काँग्रेस मान्य करते का? असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Read Also ;
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “
‘लातों के भूत बातों से नहीं मानते” म्हणत मनसेचा आंदोलनाचा इशारा