मुंबई : इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येत्या एक ते दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाधिवक्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्वच शैक्षणिक संकूले बंद आहेत.
केंद्र आणि राज्य शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने नियमांमध्ये शिथीलता आणत असताना राज्यातील शैक्षणिक वर्षाबाबत अजूनही साशंकता आहे. नेमकं महाविकास आघाडी सरकार शैक्षणिक वर्षाबाबत काय निर्णय घेणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात संभ्रमावस्था कायम आहे.
राज्यातील इ. 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेचे ऑनलाईन क्लास शालेय शिक्षण विभाग दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करत आहे. इच्छूक विद्यार्थी https://t.co/FIMuHFJGt4 येथे नावनोंदणी करून याचा लाभ घेऊ शकतात.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @scertmaha
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) November 1, 2020
दरम्यान काही शिकवणी चालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन या विषयावर त्यांच्याशी सल्लामसलत केली आहे. त्या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री श्रीम. गायकवाड यांच्याशी फोनवर बातचीत करून लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यासाठीची मागणी केली आहे.त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर आम्ही यावर निर्णय घेऊ असं सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांची कोरोनावर मात, रुग्णालयातून घरी परतणारhttps://t.co/PobtvWnndb @AjitPawarSpeaks @NCPspeaks @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020