नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दसरा निमित्ताने बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेसाठी जवळपास 1700 बसेस बुकींग करण्यासाठी जवळपास 10 कोटी पेक्षा अधिक रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला अजूनही राजकीय पक्षाची मान्यता नसल्य़ाने 10 कोटी रूपये कुठून आले? यासंदर्भात वकिल नितीन सातपुते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
“धनुष्यबाणाचं भवितव्य निवडणुक आयोगाच्या हाती..!” शरद पवारांचं सुचक वक्तव्य
शिवसेनेबाहेर येऊन त्यांनी इतर पक्षांसोबत युती करत सरकार स्थापन केलं. मात्र त्यांच्या पक्षाचं अजून पर्यंत कुठेही नोंद नाही तरी दसरा मेळाव्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटी रूपये खर्च केला आहे. एसटी बुक करण्यासाठी त्यांनी महामंडळाला रोख रक्कम भरली आहे. ती रक्कम कुणी दिली? हा जो गट आहे त्याला अद्यापही कुठलंही कायदेशीय अस्तित्व नाही. त्यामुळे महाराष्ट्रात एक दोन ते तीन लाख रूपये खर्च एखाद्या व्यक्तीनी केली तर त्याची इडी, आयटी चौकशी करीत असते. त्यामुळे जे 10 कोटी रूपये त्यांनी महामंडळाला दिली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. असं वकिल नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे.
नाशिक बस अपघात…! अपघातातील नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर; मुख्यमंत्री
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सभेला जवळपास 2 लाख लोकांची उपस्थिती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्या लोकांसाठी जेवण, खुर्च्या, तसेच त्यांची इतर केलेली व्यवस्था, तसेच महाराष्ट्रात जाहिराती लावण्यात आलेले होर्डिंग, यासाठी केलेला खर्च याची चौकशी होणं गरजेचे आहे. आपण पाहिलं असेल तर संजय राऊत यांच्याकडे सापडलेले 55 लाख तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे 4 कोटी रूपये सापडल्याने त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ते तुरूंगात गेले आहेत. त्यामुळे याची चौकशी होणे महत्वाचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“..तरी पाटील हिंदू धर्माच्या विपरीत कसे काय बोलले?” अंधारेंचा सवाल
तसेच त्यांच्या मनी लॉन्डिंग अतंर्गत गुन्हा दाखल व्हावा. तसेच समृद्धी महामार्गाद्वारे या संपुर्ण बसेस मुंबईत आणल्या गेल्या. जे की अजूनही समृद्धी महामार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्याचं काम अजूनही बाकी आहे. जर असं असतं तर अपघात होण्याचा धोका अधिक होता. त्यांच्यावर कारवाई व्हावी. अशा प्रकारच्या मागण्या आम्ही याचिकेमध्ये केल्या आहेत. असंही ते म्हणाले.
Read also
- “तर मग दलित व महिला सरसंचालक नियुक्त कधी होणार ?”काॅंग्रेसचा संघाला सवाल
- “मोहन भागवतांनी नुसतं माफी मागून चालणार नाही, तर..”; शरद पवार
- “भाजप सत्तेच्या माध्यमातून भष्ट्रचार, भय, भूक निर्माण करतंय”
- “दहा कोटी रूपये कुठून आले? शिंदेसाहेब, हा महाराष्ट्र आहे;” अजित पवारांचा इशारा
- “या गोष्टींना जर बळ दिलं, तर मला खात्री..;” मोहन भागवतांच्या वक्तव्यांनंतर पाटलांची प्रतिक्रिया