औरंगाबाद : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यातच सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत २८८ जागा लढवाणार अशी घोषणा देखील जरांगे पाटलांनी दिलीय. यातच त्यांनी पुन्हा ०४ जूननंतर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा..“राज ठाकरे मोदींच्या चरणी लीन झालेत,” कुणी लगावला टोला ?
माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोरगरिंबांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन. अशा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात”
धनगरांना फसवलं, मराठ्यांना फसवलं, आमचे वैर नाही. पण मी कार्यक्रम लावणार, गोरगरिबांना निवडून आणणार. चार ते पाच जाती एकत्रित आल्या तर १०० टक्के सत्ता आणेन. मग होऊ द्या. ७ ते ८ उपमुख्यमंत्री, एक मुस्लिम, एक धनगर, एक दलित, लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करू. शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दणादण शेतकऱ्यांची कामे करतील. मी मैदानात उतरलो, तर गोरगरिबांच्या हाती सत्ता द्या. निवडून येणारे कसे काम करणार नाहीतत ते मी बघतो. असं आवाहनही त्यांनी दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“रोहित पवारांनी थेट व्हिडीओच आणले,” पंकजा मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
हेही वाचा..“भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले”, दानवेंचा खळबळजनक आरोप
हेही वाचा..“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला
हेही वाचा..“भाजपला आता संघाची गरज उरली नाही”, जे.पी. नड्डांचं वक्तव्य चर्चेत
हेही वाचा..संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश