पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी भाजप सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी केंद्र सरकारच्या उडाण योजनेबाबत भाष्य केलं. लहान लहान शहरांना जोडण्यासाठी केंद्र सरकार ५१७ नवीन मार्ग आणणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. त्यावरून आता ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…“विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प”, केंद्रीय अर्थसंकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उडाण आणि देशभरात जलदगतीने विमानतळ विस्तारीकरणाबाबत भाष्य केले आहे. परंतु या संपुर्ण योजनेत महाराष्ट्र कुठेच दिसत का दिसत नाही ? पुणे येथील प्रस्तावित नवीन विमानतळाबाबत त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही. महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेला एक प्रस्ताव सध्या सत्तेत असणाऱ्यांनी रद्द केला. अशी टिका देखील आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा…“शरद पवार सदस्य नसतील तर मग राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली?” सभागृहात जोरदार युक्तिवाद
दरम्यान, महाराष्ट्राच्या उद्योग, वाणिज्य आणि शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी पुणे येथे नवं विमानतळ आवश्यक आहे. या विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्र जगाशी जोडला जाईल. जुन्या पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम ५ महिन्यांपासून पुर्ण झाले असून ते उद्घाटनच्या प्रतीक्षेत आहे. घटनाबाह्य मिंधे सरकारला त्याचे उद्घाटन करण्यातही रस नाही. आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ? हा अन्याय फक्त महाराष्ट्रावरच का ? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे
हेही वाचा…“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ”, सुनील देवधर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया