वाशी : मराठा आरक्षणाबाबत सरकारने आमच्या सर्व मागण्यांवर सकारात्मकता दाखवली आहे. मग आम्ही देकील एक पाऊल मागे घेत आहोत. सरकारने एवढं केलं असेल तर मग आम्ही देखील आज आझाद मैदानावर जाणार नाही. सरकारने आजच्या रात्रीपर्यंत अध्यादेश काढावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. तसेच अध्यादेश काढला नाही तर उद्या पुन्हा आझाद मैदानाकडे कुच करू, त्यानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला.
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
मनोज जरांगे पाटलांसह लाखोंच्या संख्येने मराठा समाज वाशीमध्ये दाखल झाला आहे. मुंबईत येण्याआधीच सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन जीआर काढला असून तो जीआर आज जरांगे पाटलांनी वाचून दाखवला. त्यानंतर मराठा समाजाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या. यामध्ये नोंद सापडणाऱ्यांच्या सगसोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे, शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. त्यानंतर कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा. तसेच जिल्हास्तरावर वसतीगृह बांधा. आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करू नका. केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा. आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी सरकारकडे केली आहे.
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?
याचबरोबर SEBC अंतर्गत २०१४ च्या नियुक्त्या त्वरित द्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत वर्ग १ व २ पोलीस उपनिरिक्षक पदाच्या नियुक्त्या देण्यात याव्या. सरकारने यासर्वबाबत रात्रीपर्यंत शासननिर्णयाचे अध्यादेश द्या, मग आझाद मैदानात जात नाही. परंतु आज रात्रीपर्यंत अध्यादेश आला नाही तर उद्या १२ वाजता यावर चर्चा करून आम्ही पुन्हा मुंबईकडे कुच करू. असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, जरांगे पाटलांच्या हाती सरकारचं नवीन जीआर,” भुजबळांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?