मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडक देण्याच्या तयारीत आहे. आज मनोज जरांगे पाटलांची वाशीत सभा होत असून या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. या जीआरचं वाचन जरांगे पाटील मराठ्यांसमोर करणार आहेत. यावर तोडगा निघाला नाही तर जरांगे पाटलांसह असंख्य मराठे बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. यावरून आता मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईत येण्याआधीच राज्यपालांचं मोठं विधान, मराठा आरक्षणाबाबत वेगाने हाचलाची सुरू*
ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये. अशी सातत्याने भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे. यातच आता मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलं आहे. तसेच सरकारने नवीन जीआर देखील काढला आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…
ओबीसी समाजावर अन्याय झालं असं लक्षात आलं तर राज्यात ओबीसींचं देखील आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घेईल. आम्ही जाहीर सभेतून आमची भूमिका मांडत आलो आहे. तसेच आमचा यालवरक विरोध देखील करत आहे आणि तो करणारच, असा इशारा छगन भुजबळांनी दिला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्यासह असंख्य मराठे वाशीत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल होण्याआधीच सरकारचं शिष्टमंडळ वाशीत दाखल झाले असून राज्य सरकारचं नवीन जीआर तसेच राज्य मुद्रा देखील जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. त्या जीआरचं वाचन मनोज जरांगे पाटील वाशीतल्या सभेत करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईत काही झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरणार”, विरोधकांनी सरकारला दिला कडक इशारा
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?
हेही वाचा..मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?