मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा वादळ मुंबईत धडक देण्याच्या तयारीत आहे. आज मनोज जरांगे पाटलांची वाशीत सभा होत असून या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. या जीआरचं वाचन जरांगे पाटील मराठ्यांसमोर करणार आहेत. यावर तोडगा निघाला नाही तर जरांगे पाटलांसह असंख्य मराठे बांधव मुंबईत दाखल होणार आहेत. यावरून आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…
मनोज जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासन सरकारने पुर्णपणे पुर्ण केले नाही. त्यामुळेच जरांगे पाटील आज लाखोंच्या संख्येने मुंबईत येत आहेत. त्याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. इकडे-तिकडे काही झाले. तर कायद्याचा प्रश्न निर्माण झाला. तर सरकार जबाबदार असेल असे मला वाटते. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. लाखोंच्या संख्येने मनोज जरांगे पाटलांचा ताफा वाशीत दाखल झाला आहे. आज ते आझाद मैदानावर दाखल होत असून त्याठिकाणी उपोषणाला बसणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी यावर सरकारला जबाबदार धरले आहे.
हेही वाचा“….केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
सरकार सर्वेक्षण देखील उशिरा सुरू केले, ते आधी व्हायला हवे होते. संपुर्ण मुंबईची लोकसंख्या दीड कोटी आहे. लोक घराबाहेर पडू शकणार नाहीत. अशी परिस्थिती उद्धवल्यास त्यास फक्त सरकार जबाबदार असेल. असंही जयंत पाटलांनी सांगितलं. सरकारला अनेक दिवस वेळ दिला. आता सरकारने वेळीच निर्णय घेण्याची गरज होती, पण सरकारला तो निर्णय घेता आला नाही. मोठमोठी आश्वासने देणारे लोक निर्णय घेत नाहीत तेव्हा अशा समस्या निर्माण होतात. असंही ते म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री जे काही करतात ते अंतिम असते. एक मुख्यमंत्री आणि बाकी सर्व मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना जो काही निर्णय घ्यायचा असेल त्यांनी तो घ्यावा. आम्ही मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरतो. असेही जंयत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तोडगा निघाला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार माजेल,” मराठा आरक्षणाबाबत कुणी दिला मोठा इशारा?
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य..! मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलक माघारी घेणार ?
हेही वाचा..मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईत येण्याआधीच राज्यपालांचं मोठं विधान, मराठा आरक्षणाबाबत वेगाने हाचलाची सुरू*