मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा आता वाशीत पोहचला आहे. मुंबईत धडकण्यापुर्वी वाशीतच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. यावेळी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांकडे जीआर देण्यात आला असून त्यावर दोन वाजता संवाद साधणार आहेत. यातच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता वाशीतूनच माघारी फिरणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा..“मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवा,” रोहित पवारांची महापालिकेकडे मागणी
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील आज वाशीत मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. राज्य सरकारने दिलेला जीआर यावेळी जरांगे पाटील वाचून दाखवणार आहे. त्यातच यावर दिपक केसरकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनाज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. आता शासकीय विहित नियम असतात. त्यानुसार त्या निर्णयांची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असे घडले की आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र दिले होते. परंतु आता आणखी ही ५० लाखांच्या वर होणार आहे. असे दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…सकाळी झोपतच घेतली माझी सही, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक ?
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झालं पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे तंतोतंत पालन करू. त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील. याकरीता माननीय मुख्यमंत्र्यांचे नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला काही समाजकंठकाकडून गोडसेच्या जयजयकाराच्या घोषणा, पंढरपुरात नेमकं काय घडलं?
हेही वाचा…मराठा वादळ मुंबईत येण्याआधीच राज्यपालांचं मोठं विधान, मराठा आरक्षणाबाबत वेगाने हाचलाची सुरू*
हेही वाचा…जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…
हेही वाचा“….केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार