मुंबई : मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटीतून निघालेला मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा आज मुंबईत येऊन धडकणार आहेत. त्याच्याआधी राज्य सरकारकडून मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर याच पार्श्वभूमीवर राज्यापाल रमेश बैस यांनी मोठं विधान केलं आहे. आज संपुर्ण भारतात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. त्यावेळी संपुर्ण राज्याला संबोधित करतांना राज्यपाल रमेश बैस यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर..! “२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा भुजबळांचा मान डावलला”
मराठा आरक्षणाबाबात न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे २०२३ मध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधितज्ञांचा टाक्स फोर्स स्थापन करण्यात आला आहे. असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल होण्यापुर्वीच राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेगाने हालचाली सुरू झाल्याचे यामधून दिसून येत आहे.
हेही वाचा“….हलगी आणि ढोलताशाच्या तालावर मराठा समाजातील समर्थकांचा ठेका, मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना
दरम्यान, काल मनोज जरांगे पाटलांनी लोणावळ्यातून आपल्या यात्रेला सुरूवात केली. त्यानंतर पहाटे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव वाशीत पोहचले. वाशीतच शासकीय निवासस्थानी मनोज जरांगे पाटलांनी मुक्काम ठोकला. त्यानंतर आज वाशीतून मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील कूच करणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण सुरू करणार आहेत. त्यामुळे आझाद मैदानावर स्टेज उभारणीचे काम देखील पुर्ण झाले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जागा वाटपाच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकरांची नाराजी, जयंत पाटलांचा एक फोन अन्…
हेही वाचा“….केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ १२ मान्यवरांना पद्म पुरस्कार
हेही वाचा..“मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवा,” रोहित पवारांची महापालिकेकडे मागणी
हेही वाचा…सकाळी झोपतच घेतली माझी सही, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे पाटलांची मोठी फसवणूक ?
हेही वाचा…“तिघांपैकी एकाने यावं, अन् तोडगा काढावं, लगेच माघारी फिरतो,” जरांगे पाटलांची भूमिका