उस्मानाबाद : मराठा आरक्षण विरूद्ध ओबीसी आरक्षण यावरून राज्यात सध्या जोरदार राजकीय रणकंदन बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचा पायी मोर्चा आता मुंबईच्या दिशेने निघाला असून दोन दिवसात मुंबईत दाखल होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच दोन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका असून यात १२ ते १३ खासदार ओबीसींचे निवडून गेले नाही तर आरक्षण टिकवणं कठीण राहिल असा सूचक इशारा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”
उस्मानाबाद येथे वंचितची जाहीर सभा पार पडली. या सभेतून प्रकाश आंबेडकर यांनी मोठा इशारा दिला आहे. आपल्याला उद्याचं आरक्षण वाचवायचं असेल तर याठिकाणी आरक्षणवादी राजकीय पक्ष एका बाजूला झाले पाहिजेत आणि त्यांनी आरक्षणवाद्यांना उमेदवारी दिली पाहिजे. राजकारण हे डोळसपणे पाहायला पाहिजे, आंधळेपणाने राजकारण पाहणं चालणार नाही. उद्याच्या निवडणुकीत कबाब, शबाब आणि महात्मा गांधी याचेही वाटप केले जाईल. याला जर बळी पडलात तर आरक्षण सोडा हे संविधान सुद्धा गेलं म्हणून समजा. असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
हेही वाचा…डॉ. उल्हास पाटील अन् केतकी पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, रावेर लोकसभेची चुरस वाढली
भारत देशाची गुलामीची व्यवस्था जी होती, जातीप्रथेची व्यवस्था होती, स्त्री शिक्षणविरोधी व्यवस्था होती. त्याला फुले दाम्पत्यांनी उलथवून टाकायची सुरूवात केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याचा संविधानिक मार्गाने कायमचाचं बंदोबस्त केला की, ही व्यवस्था पुन्हा कधी येणार नाही. भारतीय संविधानामुळे १८ अलुतेदार आणि १२ बलुतेदार यांना सत्तेचे दार मोकळे झाले. जे पुर्वी बंद होते. असेही आंबेडकरांनी सांगितले.
पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जुन्या काळात सत्ता देवळातून चालत असे. आता सत्तेचे केंद्र बदललेले आहे. सत्तेचे केंद्र आता लोकसभा आणि विधानसभा आहे. समाज व्यवस्थेमध्ये जे ओबीसी-मराठा भांडण सुरू झालेले आहे. जी भूमिका आम्ही घेतली आहे की ओबीसी समाजाचे ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं आहे. हे राजकीय दृष्टीकोनातून आत्ता मान्य झालेले आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला राजकारण सुरू करावे लागेल. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मार्ग बदलला, ‘या’ मार्गावरून मराठे मुंबईत धडक मारणार
हेही वाचा…रोहित पवारांसाठी शरद पवार तब्बल ११ तास बसून राहिले, अन् दुसरीकडे अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या
हेही वाचा…ईडीच्या चौकशीनंतर तब्बल ११ तासानंतर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा…“निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल”
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार