नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेवल्या आहेत. परंतु त्याआधी इंडिया आघाडीत मोठी फुट पडली आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममती बॅनर्जी स्वत:च्या बळावर लोकसभा निवडणुक लढणार असून कुणीशीही युती करणार नसल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टिका केली.
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये दाखल, खासदार रक्षा खडसे यांना मोठा धक्का, उमेदवारी जाणार?
एकीकडे ममतादीदींनी साथ सोडली.. दुसरीकडे ‘आप’ने वेगळी वाट धरली..घमंडिया आघाडीची बोट किनाऱ्याला लागण्याआधीच बुडली.. घराणेशाहीचा बुरखा पांघरणारे हे पक्ष कधीच वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाणार नाहीत, हे या घडामोडींनी स्पष्ट केलंय. निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा या आघाडीतल्या काडीमोडांना ऊत येईल.असा घणाघात चित्रा वाघ यांनी चढवला आहे.
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी, मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
इंडिया आघाडीच्या याआधी तीन बैठका झाल्या आहेत. परंतु या तिन्ही बैठकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्याबाबत वेगळी भूमिका घेतांना दिसत होत्या. यातच पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने दोन जागा मागितल्या होत्या. परंतु ममता बॅनर्जी त्या जागा सोडण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीत कुणाशीही युती करणार नसून लोकसभेच्या सर्व ४२ जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीला मोठा सुरूंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
दरम्यान, ममता बनर्जी यांना इंडिया आघाडीकडून जागावाटपांबाबत वारंवार विनंत्या करण्यात आल्या होत्या. मात्र दोन किंवा तीन जागा सोडवण्यावर त्या राजी झाल्या होत्या. यामध्ये कायमच बोलणी फिसकटत होती. यामध्ये कुठलाही सुसंवाद होत नव्हता. यातच आता लोकसभेच्या सर्व जागा आम्ही लढवणार आहोत. यातच भारत जोडो यात्रेचं निमंत्रण देखील आम्हाला देण्यात आलं नाही. त्यामुळे कॉंग्रेसने आमचा कुठलाही प्रस्ताव मान्य केला नाही. असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
एकीकडे ममतादीदींनी साथ सोडली..
दुसरीकडे ‘आप’ने वेगळी वाट धरली..घमंडिया आघाडीची बोट किनाऱ्याला लागण्याआधीच बुडली..घराणेशाहीचा बुरखा पांघरणारे हे पक्ष कधीच वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाणार नाहीत, हे या घडामोडींनी स्पष्ट केलंय.
निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येतील, तसतसा या आघाडीतल्या…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपचं आवाहन आम्ही मोडून काढू”, रोहिणी खडसेंनी भाजपच्या विरोधात पुकारला एल्गार
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”
हेही वाचा…डॉ. उल्हास पाटील अन् केतकी पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, रावेर लोकसभेची चुरस वाढली
हेही वाचा…मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांना कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांचा दिला वेळ, मराठा आंदोलक माघारी फिरणार का ?
हेही वाचा…इंडिया आघाडीत सर्वात मोठी फुट ; ममता बॅनर्जींनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांनी देखील दिला स्वबळाचा नारा