नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात स्थापन झालेली इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषीत केले आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकी आधी इंडिया आघाडीत मोठी फुट पडली आहे. सकाळी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीसोबत निवडणुका न लढण्याचे घोषीत केले होते. त्यानंतर आता दुपारी दुसऱ्या मुख्यमंत्र्यांने देखील अशीच भूमिका घेतल्याने इंडिया आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा असून कॉंग्रेससाठी ममता बॅनर्जी दोन ते तीन जागा सोडण्यास तयार होती. पंरतु याठिकाणी इंडिया आघाडीसोबत समन्वय न झाल्याने आम्ही लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असं विधान सकाळी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. यातच भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमधून जात आहे. तरी आम्हाला निमंत्रण मिळालं नाही. त्यामुळे आम्ही भाजपच्या विरोधात एकटे लढू अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
हेही वाचा….अखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये आम्ही आघाडी करणार नाही. कॉंग्रेसशी आमचे काही देणेघेणे नाही. राज्यातील सर्व १३ जागांवर आम आदमी पार्टीचा विजय होईल. असे मान यांनी ठणकावून सांगितले आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी सर्व १३ जागांवर आपचाच विजय होईल असंही म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत मोठी फुट पडल्याचे दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये दाखल, खासदार रक्षा खडसे यांना मोठा धक्का, उमेदवारी जाणार?
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी, मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान