पुणे : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाजी प्रतिक्षा अखेर संपली आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहेत. हिंदू संस्कृतीनुसार सर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान आणि चंद्र म्हणजे मन या तिन्ही देवतांना विनंती करत अग्नि यज्ञाच्या साक्षीने अखंड मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परंतु नरेंद्र मोदी व्यासपीठावर असतांनाच गोविंदगिरी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगितल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी यावरून संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा राडा, ”अल्लाह हू अकबर” च्याही दिल्या घोषणा
रोहित पवार म्हणाले की, सन्माननीय गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही. छत्रपती शिवाजीमहाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, अशी विनंती देखील रोहित पवारांनी केली आहे.
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !
दरम्यान, मला या परंपरेला बघून केवळ एका राजाची आठवण येतेय. त्या राजामध्ये हे सर्व गुण होते. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज, महाराज एकदा मल्लिकार्जूनच्या दर्शनासाठी शैलमला गेले होते. तीन दिवस त्यांनी उपवास केला. तीन दिवस ते शिव मंदिरात राहिले. महाराज म्हणाले मला राज्य करायचं नाही. मला सन्यास घ्यायचा आहे. इतिहासातील हा विलक्षण प्रसंग आहे. मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलोय, मला परत नेऊ नका. त्यावेळी महाराजांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं. आज असाच महापुरूष आपल्याला मिळालाय. भगवती जगदंबेने हिमालयातून त्याला परत पाठवलयं. जा भारतमातेची सेवा कर, तुला भारताची सेवा करायची आहे, काही स्थान असतात, जिथे आदराने आपलं मस्तक झुकतं. मला आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामींची आठवण येतेय. त्यांनी महाराजाचं निश्चयाचा महामेरू अस वर्णन केलं होतं. आज आपल्याला असाच श्रीमंत योगी मिळाला असल्याचं गोविंदगिरी महाराजांनी केलं आहे.
सन्माननीय गोविंदगिरी महाराज,
आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.#छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही… pic.twitter.com/hvnRDj76f6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
हेही वाचाअखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
हेही वाचा“सगळे जाऊ शकतात, परंतु राहुल गांधी मंदिरात जाऊ शकत नाही,” मंदिरात जाण्यावाचून राहुल गांधींना रोखलं
हेही वाचा…“आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…” नरेंद्र मोदींचं अयोध्या मंदिरात मोठं विधान