नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापन करण्यात आली. गेल्या ५०० वर्षापासून सुरू असलेली प्रतिक्षा आज पुर्ण झाल्याने संपुर्ण देशात आनंद उत्सव साजरा केला आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून दिग्गज व्यक्ती अयोध्येत उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“त्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो,” मुंबईत येण्याआधी रोहित पवारांनी जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला
अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर ‘आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली ! जय श्रीराम !’ असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण राज ठाकरे यांना देखील देण्यात आले होते. परंतु राज ठाकरे यांनी अयोध्येत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर २२ जानेवारीच्या सोहळ्याच्या निमित्ताने राजकारण सोडून मला राम मंदिर होण्यापेक्षा कारसेवकांनी कष्ट केलं होतं. त्यांचं स्वप्न पुर्ण होतंय असं म्हटलं होतं. तसेच त्या कारसेवकांसाठी २२ जानेवारीला महाराष्ट्रात रयतेला त्रास न देता चांगल्या पद्धतीने, संयतपणे आनंद साजरा करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या गटात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही”, दापोलीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, आयोध्येत राम उत्सव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात देखील राम उत्सव मोठ्या उत्सावात साजरा केला जात आहे. नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतले तर मुंबईत देखील मुख्यमंत्र्यांनी राम उत्सावात हजेरी लावली.
आज कारसेवकांचे आत्मे सुखावले आणि ३२ वर्षांनी शरयू नदी हसली !
जय श्रीराम ! pic.twitter.com/op8y73y64C— Raj Thackeray (@RajThackeray) January 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
हेही वाचा…सरकारचा मोठा निर्णय ! “..म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत”