नवी दिल्ली : प्रभू श्रीरा मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने अयोध्येत दिग्गज नेत्यांची हजेरी बघायला मिळत आहेत. परंतु अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाता फेब्रवारीत एकत्रित मंत्रिमंडळासह अयोध्याला जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे. मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन आम्ही घेणार आहोत. असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…“आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्लाही खूश होणार नाही”, सावित्रीच्या लेकींनीं नाकारली २२ जानेवारीची सुट्टी
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण सत्ताधारी मंत्र्यांबरोबर विरोधकांनाही देण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी सोहळ्याला न जाता नंतर दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथे राममंदिरात महाआरती करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंदिराच्या उद्घाटनाला जाणार नसल्याचे स्पष्टे केले आहे.
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी
दरम्यान, राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं अयोध्येतील मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. सजावटीसाठी तब्बल २ हजार ५०० क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला असून, दिल्ली कोलकत्ता इथूनच नव्हे तर थेट थायलंड आणि अर्जेंटिनामधूनही मंदिरासाठी फुलं आणली आहेत. गुजरातमधील माळी समाजानंही मंदिरासाठी ३०० क्विंटल फुलं दिली आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“त्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो,” मुंबईत येण्याआधी रोहित पवारांनी जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या गटात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही”, दापोलीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात,” शिंदेंच्या मंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात ‘मराठा वादळ’ मुंबईत धडकण्यापुर्वीच सरकार ॲक्शन मोडमध्ये, सरकारने आखली मोठी रणनिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महाभारत, अजित पवार गटाची टिका अन् त्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर