मुंबई : कोरोना काळातील मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी इडीने ठाकरे गटातील सुरज चव्हाण यांना अटक केली आहे. त्यावर अलिकडेच सुनावणी झाली असता सुरज चव्हाण यांना कोर्टाने ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांवर जोरदार टिका केलीय. यातच आता या प्रकरणातील शिवसेना शिंदे गटातील संजय माशिलकर यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ
मुंबई महापालिकेतील कथित खिचडी प्रकरणाबाबत प्रीती मेनन यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तसेच शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय माशिलकर यांच्या कथित खिचडी घोटाळ्यातील सभोवतालच्या खुलांशामुळे आम आदमी पार्टी चिंतेत आहे. एकनाथ शइंदे आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना वेठीस धरताना आपल्या साथीदारांचे सरंक्षण करताना दिसत आङे. यामुळे व्यवस्थेच्या अखंडतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी, नागरिकांच्या कष्टाने कमावलेला पैसा वसूल करण्यासाठी आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी संपूर्ण आणि निष्पक्ष तपास आवश्यक असल्याचे प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे.
संजय माशिलकर आणि त्यांचे दोन पुत्र भागीदार असलेले फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला एप्रिल- जुलै २०२० मध्ये कोविड १९ लॉकडाऊनच्या दरम्यान, स्थलांतरित कामगारांना खिचडी वाटपासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ८,६३ कोटी रूपयांचे कंत्राट दिले होते. मुंबई पोलिसांनी त्यांच्या एफ.आय.आरमध्ये याबाबत खुलासा केलाय. मेसर्स फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आवश्यक परवान्याशिवाय खिचडी वितरणाचे कंत्राट मिळवले होते. ज्यामुळे कंत्राटाच्या कायदेशीरतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक एफ.आय.आर.मध्ये मेसर्स फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या फर्मच्या भागीदारांची ओळख पटली नाही, परंतु नंतर असे दिसून आले की या फर्मचे मालक संजय माशिलकर आणि त्याचे दोन मुले प्रीतम आणि प्राजंल आहेत. अशआ प्रकारे बीएमसी द्वारे दिले गेलेले संपुर्ण कॉन्स्ट्रक्ट अवॉर्ड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि पोलीस तसेच अंमलबजावणी संचालनालय द्वारे केले जाणारे तपासावर सुद्धा शंका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच
दरम्यान, आम आदमी पार्टीचे मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सचिव असलेले संजय माशिलकर यांच्यातील घनिष्ठ मैत्रीमुळे कायदेशीर कार्यवाही मध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांच्या हस्तक्षेप होत आहे का, असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यामुळे संजय माशिलकर आणि त्यांच्या साथीदार मुलाच्या नावांचा एफ.आय.आर. मध्ये उल्लेख केले गेले नाही आणि अशा प्रकारे कथित खिचडी वितरण घोटाळ्याच्या संदर्भात त्यांची अटक टाळला गेला आहे असे दिसून येत आहे.
प्रीती शर्मा मेनन यांनी यावर भर दिला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या त्यांच्या ओळखीचे उद्योजकांना आणि मित्रांना संरक्षण देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात, तसेच विरोधी पक्ष नेत्यांच्या सहाय्यकांना आणि मित्रांना निवडकपणे अटक करतात. पारदर्शकता, उत्तरदायित्व, नागरिकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाची वसुली आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी या आरोपांची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी त्वरित सुरू करावी, अशी मागणी प्रीती शर्मा मेनन यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सचिव श्री. संजय माशिलकर यांच्या कथित खिचडी घोटाळ्यातील सभोवतालच्या खुलाशांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे २ उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांना वेठीस धरताना आपल्या साथीदारांचे… pic.twitter.com/AZcnufC8pA
— AAP Mumbai (@AAPMumbai) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…एकाच वेळी होणार लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका, केंद्र सरकारकडे अहवाल तयार
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…