जालना : मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावातून पायी निघाले आहेत. बीडमधून देखील मोठ्या संख्येने मराठा समाज आंतरवाली सराटी गावात काल दाखल झाले आणि आज जरांगे पाटलांसोबत ते आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. तर संपुर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबई दाखल होणार असून मुंबईत २६ जानेवारीला मराठा वादळ धडकणार आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा भाजप अन् संघाला दे धक्का…! डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश
मुंबईला निघाण्यापुर्वी मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकारवर जोरदार टिका केली. तर अंतरवाली या ठिकाणापासून मी आमरण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान केला होता, असेही त्यांनी म्हटलेय.
हेही वाचा…“फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार, म्हणून जरांगे पाटलांनी..” मुख्यमंत्र्यांचं मोठं आवाहन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची मराठा आरक्षणासंदर्भआत आज महत्वाची बैठक बोलवली आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार असून व्हिसीद्वारे त्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. राज्यात ज्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच नोंदी सापडलेल्यांच्या नातेवाईकांना देखील प्रमाणपत्र दिलं पाहिजे. यातच नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कायदा करा. मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा मागण्या मनोज जरांगे पाटलांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ