मुंबई : राज्यात मराठा समाजाच्या कुणबीच्या ५४ लाख नोंदी आढळल्या आहेत.या नोदींची गंभीर दखल सरकारने घेतली असून सरकार तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे २० जानेवारीला चलो मुंबई आंदोलन टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यावर राज्य सरकारचं शिष्टमंडळाने देखील जरांगे पाटलांची भेट घेतली. परंतु तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
बच्चू कडू आणि शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेतली आहे. मागासवर्ग आयोगाचं काम चालू आहे. डेटा गोळा करण्याचं काम चालु आहे. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन कायदा करणार आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावलता मराठा समाजाला आरक्षण देत आहोत. सरकार सकारात्मक असताना जरांगे पाटलांना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा…“दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, शरद पवार गटाने दाखवला ‘तो’ व्हिडीओ
राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी कटीबद्द आहे. आम्ही त्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असून, संयम ठेवा आणि मुख्यमंत्र्यांना संधी द्या. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. तर मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पुर्णपणे कमिटेड आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये याबाबतचा सकारात्मक निर्णय घेऊ. सर्वांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना संधी दिली पाहिजे. असं आवाहन फडणवीसांनी केलंय.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतरही मुंबईत जाण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतला आहे. उद्यापासून मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हजारो मराठा बांधवांनी तयारी केलीय. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांचा वादळ राज्य सरकार रोखू शकणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा भाजप अन् संघाला दे धक्का…! डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश
हेही वाचा…“फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार, म्हणून जरांगे पाटलांनी..” मुख्यमंत्र्यांचं मोठं आवाहन