मुंबई : ओबीसी आरक्षणआणि मराठा आरक्षण हे वेगळं असावं ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. त्याला जनतेनेही पाठिंबा दिला पाहिजे. मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी गरीब मराठ्यांनी पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. मुंबई येथे जे आंदोलन होणार आहे. तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे. जरांगे पाटील यांनी कुणालाही राजकीय पाठिबा न देता येणाऱ्या निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी. असं विधान वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटली राजकारणात येणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…“दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, शरद पवार गटाने दाखवला ‘तो’ व्हिडीओ
राज्यात सध्या मराठा समाजाच्या नोंदी सापडवण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातच विविध ठिकाणी मराठा- कुणबी, कुणबी-मराठा, मराठा, कुणबी,जाती आढळून आल्या आहेत. राज्यात ५४ लाख नोंदी आढळल्या आहेत. राज्य सरकारने या नोंदींची गंभीर दखल घेतली असून या नोंदींनंतर संबंधित पात्र व्यक्तींना आजपासून कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र त्वरीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेतली.परंतु तरीही त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…“मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक लोकसभेचं महत्व वाढलं,” कोण रिंगणात, कोण ठरणार किंगमेकर ?
दरम्यान, बच्चू कडू आणि शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेतली आहे. मागासवर्ग आयोगाचं काम चालू आहे. डेटा गोळा करण्याचं काम चालु आहे. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन कायदा करणार आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावलता मराठा समाजाला आरक्षण देत आहोत. सरकार सकारात्मक असताना जरांगे पाटलांना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा भाजप अन् संघाला दे धक्का…! डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश
हेही वाचा…“फेब्रुवारीत मराठा आरक्षणाबाबत कायदा करणार, म्हणून जरांगे पाटलांनी..” मुख्यमंत्र्यांचं मोठं आवाहन
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान