मुंबई : राज्यात मराठा समाजाच्या कुणबीच्या ५४ लाख नोंदी आढळल्या आहेत.या नोदींची गंभीर दखल सरकारने घेतली असून सरकार तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे २० जानेवारीला चलो मुंबई आंदोलन टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यावर राज्य सरकारचं शिष्टमंडळाने देखील जरांगे पाटलांची भेट घेतली. परंतु तरीही मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम राहिले आहेत.
हेही वाचा…“तर मग सरकारच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांचा चुराडा करण्याची काय गरज होती ?” रोहित पवारांचा सवाल
राज्यात सध्या मराठा समाजाच्या नोंदी सापडवण्याचे काम वेगाने सुरू आहे. यातच विविध ठिकाणी मराठा- कुणबी, कुणबी-मराठा, मराठा, कुणबी,जाती आढळून आल्या आहेत. राज्यात ५४ लाख नोंदी आढळल्या आहेत. राज्य सरकारने या नोंदींची गंभीर दखल घेतली असून या नोंदींनंतर संबंधित पात्र व्यक्तींना आजपासून कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र त्वरीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेतली.परंतु तरीही त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.
हेही वाचा…“चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्याच माजी आमदाराने मटका अड्ड्यावर छापा टाकला”
दरम्यान, बच्चू कडू आणि शिष्टमंडळाने जरांगे-पाटलांची भेट घेतली आहे. मागासवर्ग आयोगाचं काम चालू आहे. डेटा गोळा करण्याचं काम चालु आहे. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन कायदा करणार आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावलता मराठा समाजाला आरक्षण देत आहोत. सरकार सकारात्मक असताना जरांगे पाटलांना सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी…”,पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
हेही वाचा…“दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, शरद पवार गटाने दाखवला ‘तो’ व्हिडीओ
हेही वाचा…“मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक लोकसभेचं महत्व वाढलं,” कोण रिंगणात, कोण ठरणार किंगमेकर ?
हेही वाचा…“राज्यात मोदी साहेबांचे दौरे वाढले, पक्ष-कुटुंब फोडल्यानंतर झालेल्या सर्व्हेचा भाजपने धसका घेतलाय”
हेही वाचा…“…म्हणून रोहित पवारांच्या मतदारसंघात विखेंनी आपला कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला”