मुंबई : स्वत्झर्लंड मधील दावोस शहरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत पुन्हा परतले. या दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून १ लाख कोटींच्या गुंतवणीबाबत स्वारस्य दाखवले असल्याचे दाखवले आहे. तसेच राज्यात येणाऱ्या या गुंतवणुकीच्या माध्यमातून २ लाखांपर्यंत रोजगार निर्मिती होणार असल्याचे शिंदेंनी म्हटले आहे. यावरून आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“अरे..! काय बापाचं राज्य आहे का ?” रेल्वेत प्रवाशाला टिसीकडून बेदम मारहाण, राष्ट्रवादी शरद पवार गट संतापला
दावोस 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने MOU केलेल्या कंपन्यांपैकी 7 कंपन्या भारतीय कंपन्या असून, त्यातील 3 कंपन्यांचे मुख्य कार्यालय महाराष्ट्रातच आहेत. ह्या कंपन्यांसोबत केलेला करार सरासरी 2 लाख कोटींच्या घरात असून जर MOU ह्यांच्याशीच करायचे होते तर मग शासकीय तिजोरीतील 34 कोटी रुपयांचा चुराडा करत एवढा लवाजमा घेऊन दावोसला जाण्याची काय गरज होती? त्यापेक्षा Vibrant Gujarat सारखा एखादा कार्यक्रम महाराष्ट्रातच घ्यायचा होता. असा टोला रोहित पवारांनी सरकारला लगावला.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी सक्रीय असणारी शिवसंग्राम संघटनेत मोठी फुट, विनायक मेटेंचा भाऊ संघटनेच्या बाहेर
दरम्यान, आर्सिनिल मित्तल, निप्पोन यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या, जिंदाल, अदानी यांसारख्या देशांतर्गत नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. गतवर्षी प्रमाणेच यावर्षी केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहिल असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्याच माजी आमदाराने मटका अड्ड्यावर छापा टाकला”
हेही वाचा…“पात्रता असतांनाही सुप्रिया सुळेंना बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली”, शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“शिजलेली खिचडी आता बिघडतेय की काय असं भाजपला वाटू लागल्यानं..” सुषमा अंधारेंची जोरदार हल्लाबोल
हेही वाचा…सुरज चव्हाणांचा पाय आणखी खोलात, राम मंदिराचा सोहळा ईडी कोठडीतून पाहणार
हेही वाचानाना पटोलेंचं आव्हान अजित दादांनी स्विकारलं, म्हणाले, मोदींचंपण वय विचारणार पण…