मुंबई : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले. परंतु इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीत सामील न होता. भारत जोडो यात्रेत येणे आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकते. असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याबाबत अजूनही भूमिका घेतलेली नाही. त्यावर आता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“चंद्रकांत पाटलांना बदनाम करण्यासाठी कोथरूडमध्ये भाजपच्याच माजी आमदाराने मटका अड्ड्यावर छापा टाकला”
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आज इंडिया आघाडीत २८ पक्ष असून प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेतली पाहिजे. किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मात्र ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत. याची मला माहिती नाही. मल्लिकार्जून खरगे यांना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे ? असा सवाल देखील त्यांनी केलाय.
हेही वाचा…“पात्रता असतांनाही सुप्रिया सुळेंना बाजूला ठेऊन कार्यकर्त्यांना संधी दिली”, शरद पवारांचं मोठं विधान
गेल्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येण्यासाठी आग्रही आहेत. वंचितबाबत महाविकास आघाडीतील सर्वच नेते सकारात्मक आहेत. परंतु यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांना मल्लिकार्जून खर्गे यांच्यासोबच चर्चा करण्याचा सल्ला दिलाय.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी केंद्रात येऊन मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. देशपातळीवर आंबेडकर नाव कुणाकडे नसून ते जर आमच्यासोबत आले तर देशाचे नेते होतील. प्रकाश आंबेडकर हे दलितांचा एक चेहरा असून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन संसदेत आलं पाहिजे. असंही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“दादांनी फक्त शब्दच फिरवला नाही तर साहेबांचा विश्वास तोडलाय”, शरद पवार गटाने दाखवला ‘तो’ व्हिडीओ
हेही वाचा…“मोदींच्या नाशिक दौऱ्यामुळे नाशिक लोकसभेचं महत्व वाढलं,” कोण रिंगणात, कोण ठरणार किंगमेकर ?
हेही वाचा…“राज्यात मोदी साहेबांचे दौरे वाढले, पक्ष-कुटुंब फोडल्यानंतर झालेल्या सर्व्हेचा भाजपने धसका घेतलाय”
हेही वाचा…“…म्हणून रोहित पवारांच्या मतदारसंघात विखेंनी आपला कार्यक्रम १० मिनिटांत आटोपला”
हेही वाचा…“तर मग सरकारच्या तिजोरीतील ३४ कोटी रूपयांचा चुराडा करण्याची काय गरज होती ?” रोहित पवारांचा सवाल