मुंबई : पात्रता असून देखील सुप्रिया सुळे यांना संधी नाकारून कार्यकर्त्यांना संधी दिली. असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. त्यावरून आता अजित पवार गटाकडून यावर पलटवार केला जात आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळेंना सर्वप्रथम राज्यसभेची खासदारकी दिली गेली. असं म्हणत अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टिका केली आहे. त्यावर आता शरद पवार गटाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी त्यावर पलटवार केलाय.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार
सिंह हा मागील अनेक वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांच्या राशीतून कन्या राशीत झुकलेला आहे. म्हणूनच गृहदोष निर्माण झाला. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडून आलेल्या आमदारांच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळेंना सर्वप्रथम राज्यसभेची खासदारकी दिली गेली. त्यानंतर महाराष्ट्राला सुप्रियाताईंचं कर्तृत्व आणि पात्रता समजली. त्यांच्यात तेवढी पात्रता असती तर आज अजितदादांच्या पाठिशी असलेले ५३ पैकी ४३ आमदार त्यांच्यासोबत असते.
सुप्रिया सुळे या संसदपटू आहेत. संसदरत्न, महारत्न आहेत. त्यांचं हिंदी-इंग्रजीवर प्रभुत्व आहे. एवढं सगळं असताना दिल्लीत आणि इतर राज्यांमध्ये पक्ष का पसरला नाही? राष्ट्रीय पक्ष असताना इतर राज्यांमध्ये पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक का निवडून आले नाहीत? सुप्रियाताईंनी देशभर फिरून पक्ष का वाढवला नाही? त्यांनी पक्ष वाढवला असता, त्यांच्या माध्यमातून देशभरात १००-२०० आमदार-खासदार निवडून आले असते तर त्यांच्यामधली गुणवत्ता, पात्रता प्रमाणित झाली असती. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९० ते ९५ टक्के आमदारांचा अजितदादांना पाठिंबा आहे. लोकशाहीत ज्याच्या पाठिशी आमदार-खासदार असतात, तोच नेता असतो. ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची आवश्यकता आहे. असं उमेश पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…
फुटीर गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे लहान तोंडी मोठा घास घेत असून ते राजकारणातील परिचित संधीसाधू पात्र आहे. त्यांची सवय आहे जिकडे खोबरे तिकडे चांगभलं ! राज्याच्या राजकारणात जे बेदखल आहेत त्यांनी पात्रते ची भाषा बोलू नये. उमेश पाटील तुम्हाला राजकारणात संधी देणाऱ्या सुप्रिया ताई आहेत. माणसाने कृतज्ञ नाही होता आले तरी चालेल पण कृतघ्न तरी नाही झाले पाहिजे. सुप्रिया ताईंनी पात्रता काय आहे हे तुम्ही ज्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसला आहे. त्यांना विचारा त्यांच्या काळातच ताईंनी सर्वात जास्त वेळा संसद रत्न ,महासंसदरत्न म्हणून बहुमान प्राप्त केला आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख जागतिक पातळीवर घेतला जातो. असं प्रत्युत्तर रविकांत वरपे यांनी उमेश पाटलांनी दिलं आहे.
दरम्यान, उमेश पाटील तुमचं ” बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना. ” असं होत आहे हे समजू शकतो. पवार साहेब हे कन्या राशी मधील सिंह आहेत की रणांगणातील सिंह आहेत हे येणारा काळ ठरवेल. २०२४ मध्ये हाच सिंह जेव्हा रणांगणात उतरेल तेंव्हा कोल्हे , कुत्रे , लांडगे रणांगणात तग धरतात की पळत सुटतात हे पाहू .त्यामुळे कोणाच्या पाठीशी किती आमदार आहेत ते येणारा काळ ठरवेल. असा इशाराही त्यांनी दिलाय.
फुटीर गटाचे प्रवक्ते उमेश पाटील हे लहान तोंडी मोठा घास घेत असून ते राजकारणातील परिचित संधीसाधू पात्र आहे. त्यांची सवय आहे जिकडे खोबरे तिकडे चांगभलं ! राज्याच्या राजकारणात जे बेदखल आहेत त्यांनी पात्रते ची भाषा बोलू नये.
उमेश पाटील तुम्हाला राजकारणात संधी देणाऱ्या सुप्रिया ताई… pic.twitter.com/3huIPvH9mJ— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्लाही खूश होणार नाही”, सावित्रीच्या लेकींनीं नाकारली २२ जानेवारीची सुट्टी
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…एकाच वेळी होणार लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका, केंद्र सरकारकडे अहवाल तयार