मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कुच केली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत दीड कोटी मराठे दाखल होतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. तर आता राज्यातील लोकप्रतिनिधींकडून मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, अशी विनंती करण्यात येत आहे.
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेतली आहे. मराठा आरक्षणाचं काम अंत्यत अंतिम टप्प्यात आलं आहे. परंतु तरीही देखील मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील निघाले आहेत. २६ जानेवारीला येणार असल्याचं सांगत आहेत. त्यावर काही मार्ग काढता आलं तर काढू. परंतु टिकणारं आरक्षण हवं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी थोडी सबूरी ठेवली पाहिजे. एकदमच मोर्चा घेऊन येऊ नये. असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
तर अनेकदा वेळ देऊनही सरकारने मराठा आरक्षण प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याने शेवटी नाईलाजाने आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांना मुंबईच्या दिशेने यावे लागत आहे. अजूनही वेळ गेलेला नाही. सरकारने कुठलंही राजकारण न करता हा प्रश्न गांभीर्याने घेऊन सर्वांना अपेक्षित असा तोडगा काढावा. जरांगे पाटील यांच्यासह सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनाही विनंती आहे की, आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहेच, परंतु उपोषण केल्याने आपल्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे आंदोलन करताना उपोषण टाळून आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत तोडगाच काढायचा आहे. आम्हाला देखील मुंबईला येण्याची हौस नाही. याआधी २० जानेवारीलाच येऊ देणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर तुम्ही तोडगा काढा आम्ही तुमच्यावर गुलाल घेऊन येतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांच्यावर दिली आहे.
अनेकदा वेळ देऊनही सरकारने मराठा आरक्षण प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याने शेवटी नाईलाजाने आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांना मुंबईच्या दिशेने यावे लागत आहे.
अजूनही वेळ गेलेला नाही. सरकारने कुठलंही राजकारण न करता हा प्रश्न गांभीर्याने घेऊन… pic.twitter.com/l5pEEvVXqp
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या गटात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही”, दापोलीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…“जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात,” शिंदेंच्या मंत्र्यांचं मोठं विधान
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात ‘मराठा वादळ’ मुंबईत धडकण्यापुर्वीच सरकार ॲक्शन मोडमध्ये, सरकारने आखली मोठी रणनिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महाभारत, अजित पवार गटाची टिका अन् त्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचा…“आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्लाही खूश होणार नाही”, सावित्रीच्या लेकींनीं नाकारली २२ जानेवारीची सुट्टी