मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कुच केली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत दीड कोटी मराठे दाखल होतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. मराठा वादळ मुंबईच्या दिशेने निघताच आता सरकार देखील अॅक्शन मोडवर आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी ऑनलाईनच्या माध्यमातून हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या.
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेतली आहे. मराठा आरक्षणाचं काम अंत्यत अंतिम टप्प्यात आलं आहे. परंतु तरीही देखील मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील निघाले आहेत. २६ जानेवारीला येणार असल्याचं सांगत आहेत. त्यावर काही मार्ग काढता आलं तर काढू. परंतु टिकणारं आरक्षण हवं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी थोडी सबूरी ठेवली पाहिजे. एकदमच मोर्चा घेऊन येऊ नये. असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत तोडगाच काढायचा आहे. आम्हाला देखील मुंबईला येण्याची हौस नाही. याआधी २० जानेवारीलाच येऊ देणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले होते. त्यावर तुम्ही तोडगा काढा आम्ही तुमच्यावर गुलाल घेऊन येतो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांच्यावर दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात ‘मराठा वादळ’ मुंबईत धडकण्यापुर्वीच सरकार ॲक्शन मोडमध्ये, सरकारने आखली मोठी रणनिती
हेही वाचा…सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महाभारत, अजित पवार गटाची टिका अन् त्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचा…“आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्लाही खूश होणार नाही”, सावित्रीच्या लेकींनीं नाकारली २२ जानेवारीची सुट्टी
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं