ठाणे : एका बाजूला प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाण्यातील मीरा रोड भागात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या गाड्यांवर श्रीराम नावाचे झेंडे होते, अशा गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. तर तोडफोड करणाऱ्या व्यक्तींना यावेळी ”अल्लाह हू अकबर” अशा घोषणा देखील करण्यात आल्या. यावरून आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे. तर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !
मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी मीरा रोडच्या नया नगर भागात दोन गटांनी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दोन्ही गटामध्ये किरकोळ वाद झाला. यामुळे दोन्ही गटात मोठी हाणामारी झाली. मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु झालेल्या राड्यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
दरम्यान, मीरा भागात झालेल्या या राड्यावरून अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. याला दिव्याखालील अंधार म्हणतात. काल रात्री मुख्यमंत्री महोदयांच्या ठाण्यातील मीरा रोड भागात रामभक्तांवर हल्ला करण्यात आल्याची वर्ता व्हायरल झालीय. यात गाड्यांचे नुकसान करण्यात आले आणि यात काल महिलेलाही इजा झाल्याचे दिसते आहे. देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना अशी अप्रिय घटना घडवण्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री कारवाई करणार का ? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. असे भर रस्त्यावर होणारे हल्ले कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे ठरतात.अशी टिका देखील अंबादास दानवे यांनी केलीय.
मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2024
READ ALSO :
हेही वाचाअखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
हेही वाचा“सगळे जाऊ शकतात, परंतु राहुल गांधी मंदिरात जाऊ शकत नाही,” मंदिरात जाण्यावाचून राहुल गांधींना रोखलं
हेही वाचा…“आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…” नरेंद्र मोदींचं अयोध्या मंदिरात मोठं विधान
हेही वाचा…“देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा राडा, ”अल्लाह हू अकबर” च्याही दिल्या घोषणा