ठाणे : एका बाजूला प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाण्यातील मीरा रोड भागात राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या गाड्यांवर श्रीराम नावाचे झेंडे होते, अशा गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. तर तोडफोड करणाऱ्या व्यक्तींना यावेळी ”अल्लाह हू अकबर” अशा घोषणा देखील करण्यात आल्या. यावरून आता राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…सरकारचा मोठा निर्णय ! “..म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत”
प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी मीरा रोडच्या नया नगर भागात दोन गटांनी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये दोन्ही गटामध्ये किरकोळ वाद झाला. यामुळे दोन्ही गटात मोठी हाणामारी झाली. मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु झालेल्या राड्यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
हेही वाचा…“त्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो,” मुंबईत येण्याआधी रोहित पवारांनी जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला
दरम्यान, मीरा भागात झालेल्या या राड्यावरून अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. याला दिव्याखालील अंधार म्हणतात. काल रात्री मुख्यमंत्री महोदयांच्या ठाण्यातील मीरा रोड भागात रामभक्तांवर हल्ला करण्यात आल्याची वर्ता व्हायरल झालीय. यात गाड्यांचे नुकसान करण्यात आले आणि यात काल महिलेलाही इजा झाल्याचे दिसते आहे. देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना अशी अप्रिय घटना घडवण्यावर मुख्यमंत्री, गृहमंत्री कारवाई करणार का ? असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. असे भर रस्त्यावर होणारे हल्ले कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे ठरतात.अशी टिका देखील अंबादास दानवे यांनी केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन