सातारा : आम्ही विचारधारेच्याविरोधात लढण्यासाठी खंबीर आहोत. सध्या आमच्यापुढे भाजपचे आव्हान असून त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांच्या विचारधारेच्याविरोधात आम्ही लढणार आहोत. आज राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेले आहेत, ते किती दिवस त्यांच्याबरोबर राहतील हे आपल्याला पाहायला मिळेल. असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अजित पवार गटावर केला.
हेही वाचा…निवडणुकीच्या तोंडावर भाजपची अयोध्यावारी, मुख्यमंत्र्यांसह अख्ख मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार
रोहित पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यावरही रोहिणी खडसे यांनी सरकारवर रोष व्यक्त केला. रोहित पवार यांच्या पाठीशी राष्ट्रवादी भक्कमपणे उभी आहे. तर राज्यात महिला सुरक्षित नाहीत. पाच ते दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहे. मात्र दोषींवर तातडीने कारवाई होत नसल्याचंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
महाराष्ट्राला लाजिरवाणे वाटाव्या अशा या घटना आहेत, की ज्यांच्या हातात सुरक्षा आहे, त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण होत आहे. राजकारणातील घडामोडी पाहता महिला सुरक्षित आहेत का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, सध्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. पाच ते दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. मात्र, दोषींवर तातडीने कारवाई होत नाही. अशी नाराजीही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मागील आठवड्यात महिला पोलिसांनीच अधिकाऱ्यांकडून अत्याचार झाल्याची तक्रार केली होती. पण, त्यानंतर त्यांना त्यांच्या वक्तव्यापासून माघार घ्यावी लागली होती. महाराष्ट्राला लाजिरवाण्या वाटणाऱ्या या घटना आहेत, की ज्यांच्या हातात सुरक्षा आहे, त्यांच्याकडून दडपशाहीचे राजकारण होत आहे. पक्ष फोडणे हे लोकशाहीला घातक आहे. अशी टिका ही त्यांनी केली.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…..! “मराठा समाजाचा मुंबईतील आंदोलनाचा मार्ग मोकळा”
हेही वाचा…डॉ. उल्हास पाटील अन् केतकी पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, रावेर लोकसभेची चुरस वाढली
हेही वाचा…मुंबईत येण्याआधी मनोज जरांगे पाटलांना कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांचा दिला वेळ, मराठा आंदोलक माघारी फिरणार का ?
हेही वाचा…इंडिया आघाडीत सर्वात मोठी फुट ; ममता बॅनर्जींनंतर ‘या’ मुख्यमंत्र्यांनी देखील दिला स्वबळाचा नारा
हेही वाचा…कॉंग्रेसचा ‘हा’ बडा नेता भाजपमध्ये दाखल, खासदार रक्षा खडसे यांना मोठा धक्का, उमेदवारी जाणार?